ग्रामसेवकांच्या आत्महत्या: चिंतेचा विषय
कामाचा प्रचंड बोजा, रोज रोज नवीन योजना व आदेश,
कामकाजाच्या नियमात सुस्पष्टता नसणे,
ग्रामपंचायत पातळीवरील द्वेषाचे राजकारण,
खोट्या व सूडबुद्धीने केलेल्या तक्रारी,
वरिष्ठांचा मानसिक व आर्थिक त्रास, निरर्थक चौकशा, दडपशाही
ह्या कारणांमुळे ग्रामसेवक संवर्ग तणावात असून राज्यभरात ग्रामसेवक आत्महत्या प्रकरणे वाढली आहेत.
उपाययोजना:
खालीलप्रमाणे काही उपाययोजना करून ग्रामसेवकांवरील कामाचा ताण काही प्रमाणात कमी केला जाऊ शकतो:
◆ एक गाव एक ग्रामसेवक:- आज एका ग्रामसेवकाकडे दोन ते तीन ग्रामपंचायतीचा पदभार आहे. इतके सगळे कामकाज प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये करतांना ग्रामसेवकांच्या नाकी नऊ येतात.
◆ कामे व योजना ठरवून देणे व तेवढीच कामे करणे आवश्यक (आज उठ सूट काही आले तरी ग्रामसेवक कडे सोपवले जाते)
◆ ग्रामसभा कायमस्वरूपी बंद : ग्रामसभेचा उद्देश कितीही चांगला असला तरी मात्र लोकांनी ग्रामसभेचा दुरुपयोग केला आहे. एकमेकांचे उणेंदूने काढणे, गोंधळ घालणे, भांडण तंटे करणे, यासाठीच ग्रामसभेचा उपयोग विरोधक करत आहेत. शासकीय योजनांची माहिती मिळण्यासाठी आज अनेक समाजमाध्यमे उपलब्ध आहे. त्यामुळे ग्रामसभा हा प्रकार कालबाह्य झाला आहे. विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी कुणीही ग्रामसभेला येत नाही मात्र वादाचा मुद्दा असला की लोक ग्रामसभेत नक्की गोंधळ घालणार.
◆ वैयक्तीक लाभाच्या सर्व योजनांसाठी कृषि विभागाप्रमाणे ऑनलाइन onetime अर्जप्रणाली तयार करणे व जिल्हा, तालुका स्तरावर लाभार्थी निश्चित करणे.
◆ 7/12 प्रमाणे शासनाने नमुना नं 8 व 9 साठी एक स्वतंत्र वेबसाईट तयार करणे, व ऑनलाइन करवसुली प्रणाली विकसित करणे- (उदा. एकावेळी किमान 25% कर भरल्याशिवाय नमुना 8 उतारा डाउनलोड न होणे )
◆ MGNREGA साठी स्वतंत्र यंत्रणा तयार करणे
◆ गाव पातळीवर शासनामार्फत एक कुटूंबनिहाय सर्वेक्षण करणे ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे, सर्व माहिती, जसे आधारकार्ड, बँक खाते क्रमांक, राशन कार्ड, शौचालय सुविधा, जमीन, विहीर, जात, इत्यादी माहितीचा database तयार करणे, सदारील माहिती एका वेबसाईटवर अपलोड करून login द्वारे विविध विभागांना वापरता येईल अशी व्यवस्था करणे. दर पाच वर्षानी ही माहिती सर्वेक्षण द्वारे update करणे.
◆ योजनांचे एकत्रीकरण करणे: आज योजनांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे विनाकारण कामकाज, मिटींग, अहवाल, आराखडे यामध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे समान उद्दिष्टे असणाऱ्या योजनांचे एकत्रीकरण करणे आवश्यक आहे. ज्यामुळे योजना राबविण्यात सुटसुटीतपणा येईल.
◆ आत्महत्येस कारणीभूत व्यक्ती, अधिकारी यांच्यावर कडक कार्यवाही होणे आवश्यक आहे. ज्यामुळे जाणूनबुजून त्रास देणाऱ्यास जरब बसेल.
◆ ग्रामसेवक हा एक व्यक्ती आहे, माणूस आहे त्यामुळे एक माणूस एकावेळी किती कामे करू शकेल याचा विचार करूनच त्याच्याकडे कामे सोपविणे आवश्यक आहे.
यासारख्या उपाययोजना शासनाने राबविण्यासाठी संघटनेने शासकीय पातळीवर पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
- राजेश खाकरे
मो.7875438494
खरं आहे भाऊसाहेब...आपण ग्रामसेवक असल्याने ग्रामसेवकांना येणाऱ्या अडचणी जाणून आहात... आणि त्या अनुषंगाने वरीलप्रमाणे अतिशय विचार करून मांडलेल्या उपाययोजना प्रत्यक्षात आणण्यासाठी शासनाला संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात यावा असे वाटते..👍
ReplyDeleteWats up varati mahiti magani karane bana karavi . Wates vaparne band karave .Kontihi mahiti sankalan kalavadhi kamit kami 3/4 divas asava .
ReplyDelete2) Purvi pramane 15 divasatun ekada adava sabha P. S. Levala ghenet yavi.