गावातील ८०% लोकांना ग्रामपंचायतीशी काहीही देणेघेणे नसते. त्यांना कुठला कागद लागलाच तर ते एखाद्यावेळी ग्रामपंचायतला येतील अन घेऊन जातील. ते त्यांच्या स्वतःच्या कामात गुंतलेले असतात. ते कुणाच्या अध्यामध्यात पडत नाही. १०% लोक ग्रामपंचायत बॉडीचे सदस्य आणि त्यांचे समर्थक असतात. तर उरलेले १०% लोक विरोधक. सगळा गोंधळ, राजकारण, चढाओढ, हेवेदावे ह्या २०% लोकांमध्येच चालू असतात. ह्या २०% मधील लोकच आलटून पालटून सरपंचाच्या खुर्चीवर बसतात. कामाच्या तक्रारी करतात,चौकशा लावतात, अर्ज-फाटे करतात. आणि गंमत अशी की ह्या सगळ्या गोष्टीचा डायरेक्ट त्रास ग्रामसेवकाला होतो.
© राजेश खाकरे
#पंचायती दिनांक १५ ऑक्टोबर २०२०
Thursday, October 15, 2020
पंचायती-६
Subscribe to:
Post Comments (Atom)
पंचायती-७
ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा फक्त सचिव नसतो तर तो problem solver असतो. ग्रामपंचायतमध्ये रोज एक नवी समस्या,प्रश्न,अडचण त्याच्यासमोर येत असते; आणि...
-
लेडीज सरपंच म्हणजे तीन सरपंच ती,तिचा पती आणि तिचा मुलगा --© राजेश खाकरे ७३ वी घटनादुरुस्ती झाली आणि स्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या...
-
ग्रामसेवकांच्या आत्महत्या: चिंतेचा विषय कामाचा प्रचंड बोजा, रोज रोज नवीन योजना व आदेश, कामकाजाच्या नियमात सुस्पष्टता नसणे, ग्रामपंचायत पा...
-
एखाद्या कायद्याचा उद्देश कितीही चांगला असला तरी त्यातील कलमांचा गैरफायदा घेणारे महाभाग कमी नाहीत. माहितीचा अधिकार कायदा त्याचे ज्वलंत उदाहरण...
No comments:
Post a Comment