Thursday, October 15, 2020

पंचायती-५

एखाद्या कायद्याचा उद्देश कितीही चांगला असला तरी त्यातील कलमांचा गैरफायदा घेणारे महाभाग कमी नाहीत. माहितीचा अधिकार कायदा त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. नागरिकांना शासकीय कार्यालयाकडून आवश्यक माहिती सहजपणे मिळावी हा या कायद्याचा उद्देश! मात्र काही समाजकंटक ढिगाने अर्ज अनेक कार्यालयांना करून फक्त शासकीय कार्यालयांचा वेळच वाया घालवीत नाहीत तर, प्रसंगी कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेलिंगही करतात. आपली चुकीची कामे करून घेण्यासाठी माहितीच्या अधिकारात अर्ज करण्याच्या धमक्या देतात. असे लोकच लोकहिताच्या कायद्याचे खरे शत्रू आहेत!
© राजेश खाकरे
#पंचायती  दिनांक १५ ऑक्टोबर २०२०

No comments:

Post a Comment

पंचायती-७

ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा फक्त सचिव नसतो तर तो problem solver असतो. ग्रामपंचायतमध्ये रोज एक नवी समस्या,प्रश्न,अडचण त्याच्यासमोर येत असते; आणि...